नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी हि दमदार होत असताना पाकिस्तानी संघाची मात्र सुमार कामगिरी होताना दिसत आहे. भारतीय संघाबरोबर झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती.
भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. एकीकडे भारतीय संघाचे सेमीफायनल मधील स्थान पक्के असताना पाकिस्तान मात्र प्रवेश करण्यासाठी धडपडताना दिसून येत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यानं एक धक्कादायक विधान केल्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज मात्र वेगळेच विधान करताना दिसून येत आहे.
यावेळी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने म्हटले आहे कि, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारत पाकिस्तानला मदत करणार आहे. यासाठी भारत ३० जून रोजी इंग्लंडला पराभूत करणार असल्याचे वक्तव्य त्याने केले आहे. आपल्या युट्युब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तनी खेळाडू बाबर आझम आणि हॅरिस सोहेल यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला कि, त्यांना थोडेफार ऐकवावे लागते, मात्र आता ते उत्तम फॉर्ममध्ये आले असून पाकिस्तान नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या स्पर्धेत पाकिस्तान देखील सेमीफायनलसाठी रेसमध्ये असून त्यांचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना देखील उर्वरित तीनही सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तान सध्या गुणतालिकेत ७ सामन्यांत ७ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे इंग्लंडचा पुढील दोनपैकी एका सामन्यात जरी पराभव झाला. तर पाकिस्तानच्या आशा पल्लवित होणार आहेत.
संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या
समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे
आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय
हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक