कटक : वृत्तसंस्था – रोमहर्षक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा चार विकेट राखून पराभव केला. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांची दमदार शतकी सलामी आणि कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 316 धावांचे आव्हान दिले होते. विंडीजचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या टीम इंडियाची दमदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी विडीजच्या गोलंदाचांचा सामना करत शतकी सलामी दिली. रोहित शर्माने 63 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर राहुलनेही 77 धावांची खेळी केली. राहुलने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला.
प्रथम फलंदाजी करताना विस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड याने दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर विंडीजने भारतासमोर 316 धावांचे लक्ष केले. निकोलस पुरन याने 64 चेंडूत 89 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर पोलार्डने नाबाद 74 धावांची खेळी केली. पोलार्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 7 षटकार लगावले. होपने 42, चेसने 38 धावांची खेळी केली.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या