दुबईत सुरु असलेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत यापूर्वी भारताने केनियावर विजय मिळवून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केलं होत. काल कोरिया सोबत झालेल्या सामन्यात भारताने ३६-२० ने विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीतील भारताचा सामना इराणशी होणार आहे.
[amazon_link asins=’B01LY8U33X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca12b9fa-7c21-11e8-a341-f5a22673a709′]
भारत कोरिया सामना सुरु झाला तेव्हा कोरिया संघाने आघाडी घेतली परंतु उपांत्य फेरीत भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताचा कर्णधार अजय ठाकूरने आपल्या कौशल्यामुळे भारताला हे यश मिळवून दिले. भारताच्या बचावफळीनेसुद्धा उत्तम कामगिरी केली.