नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे . “मिशन शक्ती ” असे या मिशनचे नाव आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे. जगातील तीन देश अमेरिका रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत आता भारत जाऊन बसला आहे. या मिसाईल द्वारे फक्त तीन मिनिटात सफलतापूर्वक हे ऑपरेशन पूर्ण केले गेले. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
आगामी लोकसभा तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठीक ११ वाजून २३ मिनिटांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांसाठी महत्वाचा संदेश देण्याबाबत ट्विट केले. यापूर्वी नोटबंदी जाहीर करताना देखील नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे ट्विट केले होते. मात्र आता ऐन निवडणुका तोंडावर असताना नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर माध्यमांमध्ये याबाबत तर्क वितर्क सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठीक सकाळी 11:45 ते 12.00 च्या दरम्यान देशाला संबोधित करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर दिली. याचे थेट प्रक्षेपण ट्विव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे करण्यात आले.
मेरे प्यारे देशवासियों,
आज सवेरे लगभग 11.45 – 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा।
I would be addressing the nation at around 11:45 AM – 12.00 noon with an important message.
Do watch the address on television, radio or social media.
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2019
या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” प्रत्येक भारतीयसाठी यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नसेल काही वेळापूर्वी आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात स्पेसमध्ये या मिसाईलची चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ हे अत्यंत कठीण ऑपरेशन होते त्याच्यासाठी अत्यंत कठीण क्षमतेचे आवश्यकता होती. वैज्ञानिकांनी सगळे उद्देश प्राप्त केले आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही मोठ्या अभिमानाची बाब आहे.
PM Narendra Modi: India has entered its name as an elite space power. An anti-satellite weapon A-SAT, successfully targeted a live satellite on a low earth orbit. pic.twitter.com/VSJANo4Jt7
— ANI (@ANI) March 27, 2019