Birthday SPL : ‘भाईजान’ सलमानला कशी भेटली युलिया वंतूर ? ‘ही’ आहे तिच्या भारतात येण्याची कहाणी

बॉलिवूड स्टार सलमान खानची गर्लफ्रेंड आणि रोमानियाची टीव्ही प्रेझेंटेटर युलिया वंतूर हिचा आज वाढदिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि युलिया यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळातही ती सलमानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर होती. आज आपण त्यांच्या पहिल्या भेटीविषयी जाणून घेणार आहे. त्यांची भेट कशी झाली याबद्दल अनेक रिपोर्टमध्ये वेगवेगळे दावे केले आहेत. ती भारतात कशी आली हेही आपण जाणून घेणार आहोत.

काही रिपोर्टनुसार सलमान आणि युलिया यांची पहिली भेट 2010 मध्ये डबलिनमध्ये झाली होती. बॉडीगार्ड सिनेमाची शुटींग सुरू असताना युलिया त्याला भेटायला सेटवर आली होती. तेव्हा युलिया मारियस मोगा (Marius Moga) याला डेट करत होती. रिपोर्टनुसार मारियस हा एक म्युझिशियन आहे आणि त्यानंच सलमानला तेरी मेरी मेरी तेरी या गाण्याचे राईट्स मिळवून देण्यात मदत केली होती. कारण ते एक रोमानियन गाणं होतं जे हिमेश रेशमियानं अडॉप्ट केलं होतं.

https://www.instagram.com/p/BVGLb7GDCYf/

काही रिपोर्टमध्ये असंही सांगितलं गेलं आहे की, सलमान खान सोहेलच्या सिनेमासंदर्भातील काही कामासाठी रोमानियाला गेला होता तेव्हा तिथं पहिल्यांदा सलमान आणि युलिया भेटले.

https://www.instagram.com/p/BTfrj9wjv4b/

असंही सांगितलं जातं आहे की, पहिल्याच भेटीत त्यांची चांगली मैत्री झाली होती. तेव्हा ती मॉडेल होती. सलमाननं तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. युलिया बॉयफ्रेंडसोबत मुंबईला आल्यानंतर त्यांचं ब्रेकअफ झालं होतं.

https://www.instagram.com/p/BS98yxojT88/

एका रिपोर्टमध्ये असंही सांगितलं आहे की, 2012 मध्ये ती पुन्हा भारतात आली. तिनं अनेक सिनेमांसाठी ऑडिशन दिलं. तेव्हा सलमाननंच तिची सोय त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर केली होती.

https://www.instagram.com/p/BRyp-XfjkEU/

रोमानियातील एका टॅब्लॉईडनं युलियाला रॉयल मिसेज खान म्हटलं होतं. तिथं अशी चर्चा होती की, युलियानं सलमान सोबत लग्न केलं आहे आणि ती भारतात सेट झाली आहे.

https://www.instagram.com/p/BQT3OpKA4Sb/

एक वेळ अशीही होती जेव्हा दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. परंतु सलमाननं याचं खंडन केलं होतं. जेव्हा पब्लिकमध्ये दोघं एकत्र दिसू लागले तेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.

https://www.instagram.com/p/BJyZ0Z5DbjN/

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना युलियाला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, सलमान खानसोबत केव्हा लग्न करणार आहेस तेव्हा याला उत्तर देताना युलिया म्हणाली, “मला हाच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. मला हा प्रश्न विचारणंच निरर्थक आहे. कारण या सगळ्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे की, दोन माणसं एकमेकांप्रति काय फील करतात. मला वाटतं की, कागदांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोबत वेळ घालवणं.” असंही ती म्हणाली होती.

https://www.instagram.com/p/BFXU9vRR48L/

https://www.instagram.com/p/BFUqQynR48m/

https://www.instagram.com/p/-rrIeRx41V/