Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांची अजित पवार गटावर बोचरी टीका; म्हणाले – ‘अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- Jayant Patil On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटात दररोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क सांगितल्याने आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीनंतर शरद पवार गट आणखी आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अजित पवार गटावर बोचरी टीका केली आहे. ते पिंपरीतील एका कार्यक्रमात बोलत होते. (Jayant Patil On Ajit Pawar)

जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील काही लोक तिकडे गेले आहेत. काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले. अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसले ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, यापुढे बुद्धिमान मतदार सुजाणपणाने वाटचाल करेल.
कोणाच्या मागे जायचे, याचा योग्य निर्णय घेण्याचे काम या देशातील जनता करत असते.
आता निवडणूक विकासावर नाही तर विचारावर होणार आहे. तुम्ही कोणत्या विचारांच्या मागे आहात हे पाहून लोक मतदान करतील.

अजित पवार गट आणि अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, आता पक्षाची चोरी होत आहे.
शिवसेनेची चोरी झाली. आता आमच्या पक्षाची चोरी होऊ नये. पक्ष, चिन्ह काढून घेण्याचे मनसुबे आहेत.
आता खुर्चीत बसलेला निर्णय देत नाही. दुसरा कोणीतरी निर्णय लिहून देतो आणि खुर्चीतील व्यक्ती वाचून दाखवतो.
त्यामुळे आता चिन्ह, पक्ष न बघता लोक विचार बघून मते देतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tanaji Sawant | दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांची खरडपट्टी (व्हिडिओ)

NCP Jayant Patil On Ajit Pawar Group | जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला; म्हणाले – ‘राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी…’