#Surgicalstrike2 : ‘मांग रहा है हिंदुस्तान खतम कर दो पाकिस्तान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविताच आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे. “मांग रहा है हिंदुस्तान, खतम कर दो पाकिस्तान, बालाकोट तो झाकी है, इम्रान खान बाकी है” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबरोबरच त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे. “आज सकाळी जो हल्ला करण्यात आला त्याचा मनापासून अभिमान वाटतो. आपल्या शौर्यगाथेचा इतिहास जिवंत ठेवत भारतीय सेनेने बालाकोट, मुज्जफराबाद येथील सर्व स्थानं उध्वस्त केली. ऐतिहासिक पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या ही इच्छा भारतीय सेनेने पूर्ण करावी, मी फक्त एवढेच म्हणेन बालाकोट तो झाकी है, इम्रान खान बाकी है ” असे म्हणत त्यांनी थेट पाकच्या पंतप्रधानांवरच तोफ डागली.
मांग रहा है हिंदुस्तान 
खतम करदो पाकिस्तान
बालाकोट तो झाकी है 
इम्रान खान बाकी है

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री