मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावामुळे देशभरात हायअर्लट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला.
परंतु या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारचा हा पळपुटेपणा असल्याचा आरोप केला, जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एकीकडे मोदी देशभरात फिरतात, सभा घेतात. त्यांना संरक्षण लागत नाही का, असा सवालही त्यांनी केला. तसंच ही नाटकं बंद करा, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर याचा ताण येतो. सर्वच महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदशनशील असतो. म्हणून गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#CowardMaharashtraGovernment pic.twitter.com/HvVtap9IX7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 28, 2019