कंगना रणौतची CM ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाली – ‘दहशत पसरवणारे आज स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली जगतायेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. यावेळी तिने राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जो व्यक्ती आधी स्वत: दहशत पसरवत होता आता तोच कोरोनाच्या दहशतीखाली जगताय अशी जोरदार टीका तिने केली आहे. कंगनाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान या ट्विटवर ठाकरे सरकारने अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे शहर आता जणू एखाद्या सांगाड्यासारख भासत आहे. कधीकाळी जे इतरांना स्वत:च्या दहशतीने घाबरवत होते. आज ते स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही स्थिती पाहून मला आश्चर्य वाटते. जय मुंबा देवी, अशा आशयाच ट्विट तिने केले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने कंगना रणौतने केलेले अनधिकृत बांधकाम पाडले होते. तेंव्हापासून ती सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत आहे.