‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय’ : कंगना रनौत

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण, त्यासाठी तिला सुरक्षा देणे गरजेचे आहे. सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही, असे ट्विट करत राम कदम यांनी कंगनाला सुरक्षेची मागणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग केले होते. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असे उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिले आहे. यासोबतच हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावीपण मुंबई पोलीस नको प्लिज, असेही कंगना म्हणाली आहे. सर माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केल्याचे राम कदम म्हणाले आहेत.