जर मी ‘ते’ केलं नसतं तर माझं करिअर संपलं असतं ; अभिनेत्री करीना कपूरचा मोठा खुलासा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – यशाच्या शिखरावर पोहचताना प्रत्येकाला अनेक अडचणींनांना सामोरे जावे लागते. चित्रपट क्षेत्राबाबतही असेच काहीसे आहे. या चंदेरी दुनियेत आपले नाव कमावताना अनेक अडचणींना सामोरे जावे. अभिनेत्री करीना कपूर आता यशाच्या शिखरावर आहे मात्र तिला देखील ‘स्ट्रगलचा’ सामना करावा लागला होता. करिअरच्या एका वळणावर आल्यानंतर “आता आपले करिअर संपले असे वाटले होते. आयुष्यातील या टप्प्याबाबत तिने सोशल मीडियावरील पोस्टवरून खुलासा केला आहे.

२००० साली ‘रिफ्युजी’ चित्रपटातून करिनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला त्यानंतर खऱ्या अर्थाने तिला ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. याच दरम्यान एका वेळ अशी आली होती की आता सगळेच संपले असे करीनाला वाटत होते. याबाबत तिने शेअर केलेलया पोस्टमध्ये म्हंटले आहे की,

“माझ्या करिअरची सुरुवात फार चांगली होती. मी अनेक शानदार चित्रपट दिलेत. पण एक वेळ अशीही होती, जेव्हा मी एकही चित्रपट केला नाही. माझे करिअर आता संपले, असे मला वाटू लागले. मी नव्या दमाने सुरुवात करावी, साईज झिरोचा फंडा वापरावा, असा सल्ला याकाळात मला अनेकांनी दिला. कदाचित प्रत्येकाच्या करिअरमध्ये हे असे एक वळण येते. लोक सल्ला देतात. पण हे वळण तुम्हाला एकट्याने पार करायचे असते. हा काळ अतिशय वाईट असतो. सगळ्या नजरा तुमच्यावर असतात, असे करिनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.