Kolhapur Lok Sabha Elections | कोल्हापूर लोकसभेसाठी राऊतांची शाहू महाराजांना साद, छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Lok Sabha Elections | श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. यावर अनेकांनी वेगवेगळे मत मागील दोन-तीन दिवसांत व्यक्त केले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शाहू महाराजांना शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर लोकसभा लढण्याची ऑफर दिली आहे. छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, कोल्हापूर लोकसभेची जागा ३० वर्ष आम्ही लढत आहोत. येथे शिवसेनेला मतदान करणारा साधारण साडेतीन लाख मतदार आहे. ही जागा सोडू नये यासाठी आमच्यावर दबाव आहे. छत्रपतींचे नाव आज मी ऐकत आहोत. जागेबाबत अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल.
संजय राऊत पुढे म्हणाले, ही शिवसेनेची जागा असल्याने सगळ्यांनी मिळून शाहू छत्रपतींशी बोलण्याचे ठरवले आहे, मीदेखील त्यांच्याशी भेटून चर्चा करेन. ते मशाल चिन्हावर लढण्यास तयार आहेत का हे पाहावे लागेल.
आम्ही छत्रपतींना, त्यांच्या विचारधारेला मानतो. ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा.
जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू, असे राऊत म्हणाले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश