मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेसाठी सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले असताना आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी विधानसभा निवडणूकीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 15 ऑक्टोबरला राज्यात निवडणूक होणार असून गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणूकीनिमित्त आचारसंहिता लागू होईल असा अंदाज वर्तवला आहे. भाजप निवडणूकीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दिवाळी आधीच राज्यात नवे सरकार सत्ता स्थापन होणार अशी चर्चा रंगली आहे.
अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी निवडणूकीच्या तारखा फोडल्या आहेत असे मानले जात आहे. राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकांच्या तारखांची चर्चा सध्या रंगली आहे. परंतू सुधीर मुंगटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात विधानसभा निवडणूका येत्या 15 ऑक्टोबरला पार पडतील आणि त्यासाठी गणेशोत्सवानंतर अचारसंहिता लागू होईल.
राज्यातील सर्वात पक्ष विधानसभेसाठी तयारी करत आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून अनेक यात्रा काढण्यात येत आहे. राज्यात निवडणूकीचे वारे जोमाने वाहत आहेत. निवडणूकीच्या तारखांच्या वावड्या बऱ्याचदा उठत आहे, परंतू निवडणूक आयोगाकडून अजूनही निवडणूकीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर