अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देश, राज्यभरात भाजपचे वातावरण आहे, तसे नगरमध्ये आहे. मला मोठे मताधिक्क्य मिळाल्याने विखे पाटलांची काय ताकद आहे, हे दाखवून दिले असल्याचे भाजपचे आघाडीवर असलेले उमेदवार सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विखे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्यामध्ये पैज लागलीय. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असे त्यांना सांगितले आहे. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन, अशी परिस्थिती आहे.
राज्यात युतीच्या ४२ जागा येतील, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना ३८ जागांचा आकडा सांगितला होता. आताचा कल पाहता मुख्यमंत्र्यांचा अंदाज खरा ठरतोय, असं दिसते आहे, असेही सुजय म्हणाले.
विजय आजोबांना अर्पण
हा विजय मी माझे आजोबा बाळासाहेब विखे यांना अर्पण करतो. मला पाडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काहीजण मतभेद विसरून माझ्या विरोधात एक झाले. पण नगर जिल्ह्यातील जनतेने द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिले आहे. नगरमध्ये विखे-पाटील ही काय ताकद आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे.ट, असेही ते म्हणाले.
‘प्रवरा पॅटर्न’चा पुन्हा उदय
नगर जिल्ह्यात पुन्हा ‘प्रवरा पॅटर्न’चा उदय झालाय. देशात सगळीकडं भाजपचं वातावरण आहे, तसे ते नगर जिल्ह्यातही आहे. परंतु सर्वाधिक मताधिक्यातून इथं विखेंची ताकद दिसली आहे,’ असे सुजय विखे म्हणाले.