मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. शुक्रवारी (दि.22) दिवसभरात 2 हजार 779 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 3 हजार 419 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 19 लाख 06 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.17 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Maharashtra reports 2,779 new #COVID19 cases, 3,419 discharges, and 50 deaths today
Total cases – 20,03,657
Total recoveries – 19,06,827
Death toll – 50,684
Active cases – 44,926 pic.twitter.com/rHial17Y6C— ANI (@ANI) January 22, 2021
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 20 लाख 03 हजार 657 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 44 हजार 926 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यामध्ये 12 हजार 926 अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यानंतर ठाण्यात 7 हजार 808 तर मुंबईत 6 हजार 442 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 684 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.53 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. मुंबईत 11 हजार 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 7 हजार 888 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात 5 हजार 726 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 40 लाख 80 हजार 930 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 03 हजार 657 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.23 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 13 हजार 414 होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 019 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.