Coronavirus in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8623 नवीन रुग्ण, 51 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. डिसेंबरपासून राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत होती. मात्र, आता कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने राज्याचे टेन्शन वाढल आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 623 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आज राज्यात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 092 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.43 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 648 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 20 हजार 951 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या राज्यात 72 हजार 530 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 61 लाख 99 हजार 818 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 46 हजार 77 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.25 टक्के इतके आहे. सध्या 3 लाख 34 हजार 102 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 3 हजार 084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.