Coronavirus : राज्यात 4516 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 94.98 %
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, आज (मंगळवार) कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या सख्येत वाढ झाली आहे. आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात फक्त 2 हजार 294 रुग्ण सापडले आहेत. तर 4 हजार 516 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 19 लाख 94 हजार 977 इतकी झाली आहे.
Maharashtra reports 2,294 new #COVID19 cases, 4,516 discharges, and 50 deaths today
Total cases – 19,94,977
Total recoveries – 18,94,839
Death toll – 50,523Active cases – 48,406 pic.twitter.com/BRZ6jKxIth
— ANI (@ANI) January 19, 2021
आज राज्यात दिवसभरात 4 हजार 516 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात 18 लाख 94 हजार 839 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 50 हजार 523 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Maharashtra's COVID-19 tally rises to 19,94,977 with 2,294 fresh cases; 50 new deaths take toll to 50,523: Health department
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2021
राज्यात आज दिवसभरात 50 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 50 हजार 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.53 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 38 लाख 95 हजार 277 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 94 हजार 977 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.36 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 18 हजार 058 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 996 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.