पाटणा : वृत्तसंस्था – तुम्ही इतक्या उशिरा शहीद झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहात हा त्या शहीदाचा अपमान आहे असे म्हणत निरीक्षकांच्या नातेवाईकांनी मंत्र्याची कान उघडणी केली आहे. दहशतवाद्यांविरोधात लढताना हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ निरीक्षकाच्या अंतिम दर्शनाला येण्यासाठी वेळ नसलेल्या मंत्र्यांना शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं चांगलंच सुनावलं.
#WATCH BJP Min Vijay Sinha visited residence of CRPF Inspector Pintu (who lost his life in Handwara encounter on Mar 1) in Begusarai late-night y'day. A family member of the CRPF personnel says, 'This doesn't work, you came so late to pay tributes. It's a martyr's insult.' #Bihar pic.twitter.com/aIeJMyPzZ8
— ANI (@ANI) March 4, 2019
सीआरपीएफ निरीक्षक पिंटू कुमार सिंह हे जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झाले. काल सकाळी त्यांचं पार्थिव पाटण्यात आणण्यात आलं. परंतु त्यावेळी विमानतळावर राज्यातील एकही सत्ताधारी पक्षाचा नेता, मंत्री उपस्थित नव्हता. राजधानी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं एनडीएचे नेते, राज्याचे मंत्री व्यस्त होते. याबद्दल शहीद निरीक्षकाच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि मंत्री विमानतळावर हजर झाले होते. परंतु त्याच्या काही वेळ आधीच हुतात्म्याचं पार्थिव आणलं गेलं होतं. परंतु त्यावेळी मात्र कोणताही नेता विमानतळाकडे फिरकल्याचे दिसले नाही.
काल मोदींची संकल्प रॅली पार पडली. बिहारच्या सत्ताधाऱ्यांनी पिंटू कुमार सिंह यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवली. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकही बिहार, जेडीयूचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. संकल्प रॅलीनंतर बिहारचे मंत्री आणि भाजपा नेते विजय सिन्हा शहीद सीआरपीएफ निरीक्षकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले. यावेळी मात्र शहिदाच्या कुटुंबीयांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
परंतु त्यांच्या खडेबोल सुनावल्यानंतर मात्र त्या मंत्र्याने त्यावर सारवासारव करताना, आमच्या सहवेदना तुमच्यासोबत आहेत. त्यामुळेच तर तुमची भेट घेण्यासाठी आलो असे वक्तव्य केले. इतकेच नाही तर आपण रॅली संपल्या संपल्या तुमची भेट घेण्यासाठी आलो असेही सांगितले. यानंतर मात्र शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं मात्र त्याला चांगलंच धारेवर धरलं. ‘तुम्ही इतक्या उशीरा येत आहात. याला अर्थ नाही. हा शहिदाचा अपमान आहे,’ अशा शब्दांमध्ये कुटुंबीयांनी त्यांचा संताप व्यक्त केला. दरम्यान थातूरमातूर स्पष्टीकरण देत सिन्हा यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.