नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे, वाढत्या बेरोजगारीचे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर मोदी सरकारमधील एका नेत्यांने दावा केला आहे की, केंद्र सरकारने ४ लाख जणांना नोकरी देण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केल्याचे सांगितले आहे.
राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत प्रश्नकाळादरम्यान सांगितले की, रिक्त जागा भरुन त्याचा टक्का मागील सहा वर्षात जवळपास १६ टक्कांनी कमी करुन ११ टक्के केला आहे.
सिंह यांनी रिक्त पदांच्या आकड्यांबद्दल सांगताना २०१३ – २०१४ मध्ये रिक्त पदाचा टक्का १६.२ होता. यानंतर यात कमतरता येऊन ती २०१४ – १५ मघ्ये ११.५७ टक्के झाली. जेव्हा २०१५ -१६ मध्ये ही संख्या ११.५२ झाली होती. तर २०१६ – १७ मध्ये ११.३६ टक्के होता.
या परिक्षा सध्या घेण्यात येत आहे असे देखील राज्यमंत्र्यांनी सांगितले. या अंतर्गत केंद्रच्या निवड आयोगाकडून ही निवड होणार आहे. यात विविध विभागातून ही परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की २०१७ – १८ मध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ६,८३,८२३ होती. यात आधिक पदे रेल्वे बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणार आहे. यात जवळपास ४ लाख पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- पावसाळ्यातील ‘हे’ किरकोळ आजार झटपट दूर करा, १५ रामबाण उपाय
- उपवास केल्यामुळे वाढते आयुष्य, गंभीर रोगांचा धोका होतो कमी
- ६ आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारावर गुणकारी अननस
- हळद, दही, गाजराच्या फेसपॅकने सुकलेला चेहराही उजळेल
- योगमुद्रासन केल्याने दूर होतात पोटाचे विविध आजार, जाणून घ्या
- बद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर १२ फायदे
- टोमॅटो, बटाटा, सफरचंद, कोबीने दूर करा स्किन प्रॉब्लेम्स, जाणून घ्या
- मोहरीचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी होते दूर, वाचा ८ फायदे
- रक्ताची कमतरता दूर करते डाळिंब ; जाणून घ्या, इतर ९ फायदे
- कफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास १४ फायदे