Coronavirus : देशात ‘कोरोना’मुळं झालेल्या मृत्यूपैकी 50 % बळी ‘या’ 2 राज्यातील, जाणून घ्या कोणत्या ठिकाणी किती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 369 जणांचा आणि गुजरातमध्ये 162 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. या दोन राज्यात संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 12138 आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 29435 पर्यंत पोहोचली आहे आणि या साथीच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 934 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर, बरे झाल्यानंतर 6869 लोकांना विविध रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या मते, देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
राज्य संक्रमित बरे मृत्यू
अंदमान-निकोबार 33 11 0
आंध्र प्रदेश 1183 235 31
अरुणाचल प्रदेश 1 1 0
आसाम 36 27 1
बिहार 345 57 2
चंदीगड 40 17 0
छत्तीसगड 37 32 0
दिल्ली 3108 877 54
गोवा 7 7 0
गुजरात 3548 394 162
हरियाणा 296 183 3
हिमाचल प्रदेश 40 22 1
जम्मू-काश्मीर 546 164 7
झारखंड 82 13 3
कर्नाटक 512 193 20
केरळ 481 355 4
लडाख 20 14 0
मध्य प्रदेश 2168 302 110
महाराष्ट्र 8590 1282 369
मणिपूर 2 2 0
मेघालय 12 0 1
मिझोरम 1 0 0
ओडिशा 118 37 1
पुडुचेरी 8 3 0
पंजाब 313 71 18
राजस्थान 2262 669 46
तामिळनाडू 1937 1101 24
तेलंगणा 1004 321 26
त्रिपुरा 2 2 0
उत्तराखंड 51 33 0
उत्तर प्रदेश 1955 335 31
पश्चिम बंगाल 697 109 20
एकूण संख्या 29435 6869 934