मुख्यमंत्र्यांना आव्हान देणार्या इम्तियाज जलील यांना भाजपच्या ‘या’ खासदाराकडून प्रत्युत्तर
पोलिसनामा ऑनलाईन – दारूविक्री करण्याची आणि माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असे ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत लॉकडाउनचे नियम तोडण्याचे आव्हान दिले होते. भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लॉकडाऊनचे नियम तोडण्याची भाषा खासदाराला शोभते का चिथावणीखोर भाषा वापरणार्या खासदारावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून महिलांना रस्त्यावर उतरवू असे म्हणणे, म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं खासदार भागवत कराड यांनी म्हटले आहे.
Govt decides to open liquor shops even in red zone! If shops in Aurangabad open then v will break all lockdown restrictions & forcibly close down these shops. Will make many women come out on streets. This is not time to sell liquor & create problems for r mothers and sisters.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 3, 2020
राज्यातील मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरानंतर औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रेड झोन असलेल्या औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 300 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 10 जणांना जीव गमावावा लागला आहे. एकीकडे ही स्थिती असताना अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारकडून हॉटस्पॉट नसलेल्या भागात मद्यविक्रीचा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Sir with due regards can u tell me what is source of MIDC water? Can u pls tell on behalf of liquor factories how much these beer producers have spent on the city from their CSR fund to fight Covid19. Nill as far as my info from collector office. https://t.co/tOdbDWKEvh
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 3, 2020
औरंगाबादमधील दारूचे दुकाने उघडल्यास आम्ही सर्व लॉकडाऊनचे निर्बंध तोडू आणि सक्तीने ही दुकाने बंद करू. महिलांना घेवून रस्त्यावर उतरू. दारूविक्री करण्याची आणि माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असे ट्वीट करत इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर भाजपा राज्यसभा खासदारांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.