रुग्णवाहिका न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू 

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वे प्रशासनाच्या कारभाराने असंवेनशीलतेचा कळस गाठला आहे. रेल्वे अपघातात जखमी झालेली व्यक्ती रुग्णवाहिकेअभावी उपचार न मिळून मृत्यू पावली. रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका व्यक्तीचा हकनाक बळी गेला. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे या व्यक्तीच्या मृतदेहाची दिवा-ठाणे लोकलमधून फरफट करण्यात आली. सदर घटना दिवा ते तळोजादरम्यान घडली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’984f23d8-d07e-11e8-b964-677ea88c251a’]
रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास  कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत दिवा ते तळोजा स्थानकादरम्यान व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही माहिती उशिराने दिवा स्टेशनला रात्री अडीच वाजता मिळाली. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने रात्री २:३० ते सकाळी ६:३० वाजेपर्यंत काहीच हालचाल केली नाही. एवढ्या रात्री घटनास्थळी जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सच उपलब्ध नसल्याचं कारण रेल्वेकडून देण्यात आलं. त्यामुळे उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मात्र मृत्यूनंतरही त्या व्यक्तीच्या मृतदेहाची परवड सुरुच राहिली.सकाळी सहा वाजता दिव्यातून जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसने  हमाल आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिवा स्थानकात परत येण्यासाठी रोहा-दिवा पॅसेंजरची वाट पाहिली. अखेर सकाळी साडेआठ वाजता मृतदेह दिवा स्थानकात आणला.
[amazon_link asins=’B07417987C,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8471eec-d07e-11e8-a7c1-91198ec889e6′]
यानंतर दिवा-ठाणे लोकलच्या भर गर्दीतून हा मृतदेह ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. केवळ अॅम्ब्युलन्स नसल्याचं कारण देत या व्यक्तीवर उपचार केले नाहीत.  तब्बल सहा तास या व्यक्तीची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर व असंवेदनशीलपणावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.