मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
प्रादेशिक हवामान विभागाने गुजरात जवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते. हवामान विभागाकडून महानगरपालिकेला आलेल्या ई-मेलनुसार महापालिकेने मंगळवारी दुपारी इशारा देणारे संदेश जारी केले. त्यात त्या चक्रीय वात चे चक्रीवादळ असे भाषांतर केल्याने एकच अफवांचा बाजार मुंबईत उडाला होता.
[amazon_link asins=’B01LY8U33X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68e94419-84cd-11e8-a4ab-59462a179bc0′]
प्रादेशिक हवामान विभागाकडून मुंबईत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यात पालघर आणि ठाणे जिल्हांना अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी पडणारा धो धो पाऊस पाहून मुंबईकरांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यात महापालिकेकडून दुपारच्या सुमारास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाकडून आलेल्या ई-मेलनुसार हा इशारा महापालिकेने दिला होता आणि तेथेच घोळ झाला. इशारा देताना गुजरातजवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते, त्याला चक्रीवादळ असे संबोधले गेले.