NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – NCP MP Amol Kolhe | शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार (State Govt) केंद्राकडे ठाम भूमिका मांडत आहे की फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभे राहणार? असा सवाल करत आज प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढला. कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला ( Shetkari Morcha) शिवनेरी (Shivneri) येथून आजपासून सुरूवात झाली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
अमोल कोल्हे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे ठाम भूमिका मांडत आहे की फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभे राहणार? गेले तीन आठवडे कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे.
सरकारमधील प्रतिनिधीकडून केवळ मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यापलीकडे कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) आव्हानाचे मोर्चावर दडपण आहे का, असा सवाल विचारला असता,
अमोल कोल्हे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी दडपण कसले? अजित पवार मोठे नेते आहेत. (NCP MP Amol Kolhe)
त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकत्र्याने प्रतिक्रिया देणे उचित नाही. अजित पवार सरकारमधील महत्वाचे घटक आहे. तेवढीच धडाडीची पावले अजित पवार यांच्याकडून पडावीत अशी शेतकऱ्यांसह आमची अपेक्षा आहे, असा टोला कोल्हे यांनी लगावला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Former MLA Sharad Patil Passed Away | जायंट किलर माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन
संतापजनक! घरासमोर कपडे काढून महिलेचा विनयभंग, कोंढवा परिसरतील प्रकार