पाकिस्तानी साखरेच्या गोदामावर राष्ट्रवादीचा छापा
मुंबई : वृत्तसंस्था
देशात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. तरी देखील पाकिस्तानातून साखर आयात केली जाते आणि आता त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या साखरेवरुन मनसेने इशारा दिला असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण तालुक्यातील एका गोदामावर सोमवारी सकाळी धडक दिली. या गोदामात पाकिस्तानमधून आयात केलेली साखर लपवून ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी साखरेच्या गोण्या फाडून विरोध दर्शवला. या गोदामात दोन हजार मेट्रीक टन साखर लपवून ठेवण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ,राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातून आयात केलेल्या साखसरेविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. या बाबत माहिती देताना आव्हाड म्हणाले की,”पाकिस्तानातून गेले काही दिवस आयात केलेली साखर कोणत्या गोदामात आहे याचा आम्ही शोध घेत होतो.ही साखर अखेर कोणत्या गोदामात आहे याचा सुगावा लागला आणि आम्ही तिथे पोहचलो. सौरभ मल्होत्रा नामक व्यावसायिकाने ही साखर मागवली असून सुकमा एक्स्पोर्ट्स मार्फत ही साखर राज्यात पोहोचली. या कंपनीने ४२०० मेट्रिक टन साखर मागवली असून त्यातील दोन हजार मेट्रिक टन साखर या गोदामात लपवून ठेवण्यात आली होती,” असे आव्हाड यांनी सांगितले.
राज्यात पाकिस्तानी साखर नको, असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साखरेने भरलेल्या गोण्या फाडून विरोध दर्शवला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पाकिस्तानातून साखर आयात करणं म्हणजे उस उत्पादक शेतकरी व साखर कारखाने उद्ध्वस्त करण्यासाठी उचललेले पाउल आहे. पाकिस्तानला आपला राजकीय शत्रू
मानणा-यांना पाकिस्तानची साखर मात्र आता गोड वाटायला लागली आहे.#पाकिस्तानची_साखर_विकू_देणार_नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 12, 2018
Using Pakistan's name as a tool for hate politics is BJP's favourite agenda. The same BJP Government now imports sugar from Pakistan and serves it in India destroying the sugar economy of India.
*Is That Sugar More Sweeter ?* #SayNoToPakistanSugar pic.twitter.com/8o5BbbLo10— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 12, 2018
गोड साखर, कडू लोकशाही!
भारताची फाळणी तर टाळता आली नाही. दोन वेगळी राष्ट्रं म्हणून जर यापुढे शेजारी रहायचं असेल तर एकमेकांवर बंदुका रोखून उभं राहिलं तर कुणाचंच भलं होणार नाही. त्यामुळे शांततेने आणि मित्रत्वाने… https://t.co/szj35rQyVa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2018
एरव्ही पाकिस्तान आणि जिनाच्या नावाने शिव्या घालणारे, पाकिस्तानची साखर खाण्यात धन्यता मानतायेत.
दहिसर मोरी येथे लपवलेले साखरेचे गोडाऊन आज फोडले आणि हे सरकार किती नाटकी आहे याचा सबळ पुरावा देशाला सादर केला.
निर्णय घ्या पाकिस्तानची साखर खाणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2018