इस्लामाबाद : भारताच्या वायुदलाने पहाटे पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून हल्ला केल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओही पाकिस्तानने जारी केला असून त्यात मिराज विमाने हल्ला करताना दिसत आहेत.
याबाबत पाकिस्तानकडून सांगण्यात आले की, पुलवामा येथील घटनेनंतर अशा प्रकारचा हल्ला भारताकडून होण्याची शक्यता अपेक्षित करीत होतो. त्यादृष्टीने आम्ही तयार होतो, असे सांगण्यात आले.
या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मेजर जनरल असीफ गफूर यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. याबाबत दुपारी भारतीय हवाई दल व लष्कराकडून प्रेस कॉम्फरन्स घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला
भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त