‘कोरोना’तून बऱ्या होणाऱ्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज, ‘या’ आजाराने ग्रस्त आसलेल्यांना धोका कायम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राजधानीमध्ये 80 टक्केपेक्षा जास्त लोक कोरोना संसर्गातून बरे होत आहेत, परंतु ते पुन्हा संक्रमित होण्याची शंका काय आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांच्या शरीरात कोरोना संक्रमणाविरूद्ध अँटीबॉडी कमी तयार झाली आहे आणि जे अगोदरच अन्य आजाराने पीडित आहेत, असे लोक पुन्हा संक्रमित होण्याचा धोका आहे. यासाठी जरूरी आहे की, कोरोनातून बरे होणार्‍यांनी काळजी घेतली पाहिजे.

अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर यश गुलाटी म्हणतात की, कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडी तयार होते. परंतु, असे आढळले आहे की, बरे होणार्‍या एक तृतीयांश लोकांमध्ये योग्य अँटीबॉडी तयार होताना दिसत नाही. अशा लोकांमध्ये संक्रमाणाचा पुन्हा धोका आहे. गुलाटी यांच्यानुसार, देश आणि जगात अजूनपर्यंत कोणताही असा शोध लागलेला नाही, ज्याद्वारे समजू शकते की, पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता अजिबात नाही. यासाठी जरूरी आहे की, यामध्ये ह्रदय, किडनी आणि श्वासाच्या रूग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

श्वासाच्या रूग्णांनी विशेष काळजी घ्यावी
श्वासाचा रूग्ण जेव्हा कोरोनातून ठिक होतो, तेव्हा म्हणजे ताप इत्यादी नसतो आणि ऑक्सीजन स्तरसुद्धा ठिक होतो, तरीसुद्धा अनेकदा व्यक्तीच्या फुफ्फुसात इतकी ताकद नसते जेवढी अगोदर असते. ही ताकद पूर्ववत होण्यास वेळ लागतो. यासाठी श्वासाच्या रूग्णांनी बरे झाल्यानंतर छाती आणि फुफ्फुसांचे व्यायाम करत राहावे.

हृदयाचे आजार असणारेसुद्धा असुरक्षित
अशाप्रकारे आपल्या हृदयाच्या धमण्यासुद्धा प्रभावित होऊ शकतात. हृदयाचे धडधडणे किंवा हृदयातून रक्त पुढे पाठवण्याची शक्ती कमी होऊ शकते. असे जुन्या आजारांमध्ये सुद्धा दिसून आले आहे. यासाठी असे झाल्यानंतर काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी तपासणी केली पाहिजे किंवा काही त्रास असल्यास उपचार केला पाहिजे.