PM-Kisan : सरकारने नियमांमध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या आतापासून कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचा फायदा घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान किसान निधीच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे. सरकारने म्हटले की, आतापासून ज्या शेतकर्यांच्या नावावर शेत आहे, त्यांनाच 6 हजार रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक प्रकारच्या चुका समोर आल्या आहेत, ज्यावरुन सरकारने त्यात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याजवळ शेतीचे म्युटेशन आपल्या नावे करावे लागेल. दरम्यान अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी त्यांच्या नावावर शेतीच्या जमिनीचे म्युटेशन केले नाही. दरम्यान, हा नवीन नियम योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांना लागू होणार नाही असे सरकारने म्हटले आहे. म्हणजेच, नवीन नियम नोंदणी करणाऱ्यांना हा नियम लागू होईल. नवीन नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना आतापासून अर्जांच्या जागेचा भूखंड क्रमांक द्यावा लागेल. ज्या लोकांचे संयुक्त कुटुंब आहे त्यांना त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्या नावावर मिळवावी लागेल. तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. जर शेतकर्यांनी जमीन विकत घेतली असेल तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही.
कोणत्या लोकांना मिळत नाही फायदा
जर एखादा शेतकरी शेती करतो पण शेती त्याच्या नावावर नसून त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर नसेल तर त्याला वर्षाकास 6000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. जमीन शेतकऱ्यांच्या नावे असावी. एखादा शेतकरी दुसर्या शेतकर्याकडून भाड्याने जमीन घेत असल्यास त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. जर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असणाऱ्या सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे काय ?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. ज्याचे उधिष्ठ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आहे , म्हणून केंद्र सरकार पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. सरकार एका वर्षामध्ये तीन हप्त्यात सहा हजार रुपये देते. एक हप्ता 4 महिन्यांत येतो. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात.
अशा प्रकारे ट्रान्सफर केले जातात पैसे
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो, त्यानंतर ते अर्ज राज्य सरकार, तुमच्या महसुलाची नोंद, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक पडताळणी करतात. राज्य सरकार आपल्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पैसे येत नाहीत. राज्य सरकार पडताळणी करताच एफटीओ तयार होते, त्यानंतर केंद्र सरकार ही रक्कम खात्यात वर्ग करते.