मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोगाचा अधिकारी ‘गायब’

नादिया : वृत्तसंस्था – लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. मात्र पश्चिम बंगालमधील रानाघाट मतदारसंघातील निवडणूकीच्या ड्यूटीवर असलेले निवडणूक अधिकारी अचानक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्नब रॉय असे गायब झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

https://twitter.com/ANI/status/1119186315680129024

अर्नब रॉय हे रानाघाट मतदारसंघातील बिप्रादास चौधरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात निवडणूक ड्य़ुटीवर होते. त्यांच्याकडे या मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनची जबाबदारी होती.

गुरुवारी सहकाऱ्यांसोबत त्यांनी जेवण केले. त्यानंतर ते अचानक गायब झाले. २४ तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान याप्रकरणी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.