Praveen Darekar On Sanjay Raut | राऊतांची टीका भाजपाला झोंबली, दरेकरांचे प्रत्युत्तर, ”यांना ग्रामपंचायत प्रचाराला देखील कोणी बोलावत नाहीत”

मुंबई : Pravin Darekar On Sanjay Raut | राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात थांबायला वेळ आहे का? ते इतर राज्यातील प्रचारात असतील तर राज्यातील प्रश्नांचे काय? त्याकडे कोण लक्ष देणार? अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत यांनी केली होती. ही टीका भाजपा (BJP) नेत्यांना झोंबली आहे. यावरून आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर (Pravin Darekar On Sanjay Raut) तोंडसूख घेतले आहे.

प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, आता संजय राऊत यांना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रचारासाठी कोणी बोलवत नाही. देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत. त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून सर्वत्र जावे लागते. देवेंद्र फडणवीस बाहेर जाऊन प्रचार करतात तर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठतो? संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव आहे.

सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण गढून झाले आहे. सरकारमधील मंत्रीच सरकारच्या मराठा आरक्षण धोरणाविरूद्ध बोलत आहेत. सर्वत्र गोंधळाची स्थिती असताना मध्यंतरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच राज्यातील प्रचारात गुंतले होते. त्यामुळे संजय राऊत यांनी फडणवीसांवर ही टीका केली होती.

दरम्यान, लोअर परळ पूल उद्घाटनप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे जे करतात, ती दडपशाही आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. (Pravin Darekar On Sanjay Raut)

दरेकर पुढे म्हणाले, तुम्ही जर कायदाच मानणार नसाल, कायदा हातात घेऊन
वातावरण खराब करत असाल तर त्यानुसार कारवाई होते. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे.
जर हे असे वागायला लागले तर इतरही लोक तेच करतील. लोकांचे धाडस वाढेल आणि वातावरण खराब होईल.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रवीण दरेकर म्हणाले,
कुणीही त्या समाजाचे पालकत्व घेतल्यासारखी भाषा करू नये. मग छगन भुजबळ असू दे किंवा जरांगे पाटील.
समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम कोणी करू नये. अराजकता माजवू नये. गर्दी जमते म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मालक नाहीत.
अन्यथा अशा मेळाव्यात उपस्थित राहायचे की नाही याचा समाजही विचार करेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुख्यमंत्री होण्यासाठी हे सगळं चाललंय, राज्यात दंगली घडवायच्यात, जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप