पुण्यात पुन्हा लॉकडाऊन ? आगामी 8 दिवसात ठरणार !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरासह पिंपरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट टाळेबंदी कारायची कि नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्याची कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था  आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांची नेमणूक केली होती. या संस्थांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पुणे, चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. सध्याची कोरोनाची लाट पाहता ही रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष या संस्थांनी केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. ही रुग्णसंख्या वाढू द्यायची नसल्यास काही उपाययोजना कराव्या लागतील, मात्र या उपाय योजना करताना शास्त्रोक्त विश्लेषण व अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसांमध्ये सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित मात्र, कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

सौरभ राव म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने आयसर आणि टीसीएस या संस्थांना विनंती केली होती. त्यानुसार या संस्थांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तलयात शुक्रवारी सादरीकरण केले. त्यामध्ये सध्याच्या लाटेनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आसलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत ५० टक्के रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावर आगामी काळात ही संख्या वाढू नये म्हणून कोणकोणत्या प्रतबंधात्मक उपाययोजना (निर्बंध) करता येतील, याबाबत दोन्ही संस्थाना शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण, अभ्यास करण्यास सांगितले आहे. या संस्थांनी त्याकरिता आठ दिवसांच्या कालावधी मागितला असून पुढील आठवड्यात याबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठकीत दोन्ही संस्थांनी केलेल्या सादरीकरणाची माहिती सादर केली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन कोणत्या प्रकारचे निर्बंध पुण्यात लागू करायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित निर्बंध –
नियंत्रित निर्बंध म्हणजे ठरावीक कालावधीसाठी शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मद्यालये या ठिकाणीची केवळ पार्सल सेवा सुरु ठेवणे, दोन महिन्यांसाठी विवाह सोहळे बंद ठेवणे यासारखे निर्बंध लागू केल्यास कितपत रुग्णसंख्या आटोक्यात राहील, याबाबत टीसीएस, आयसर यांच्याकडून सादरीकरण केले जाणार आहे. या संस्थांनि अहवाल दिल्यानंतर आठ दिवसांनी सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.