पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या दाजींवर नाराज होता मेहुणा ! दारू पाजून केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राजस्थानमधील अलवरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे पत्नीवर चुकीची नजर ठेवल्यामुळे मेहुण्याने आपल्या दाजीला ठार केले. त्याचा आरोप आहे की, त्याचा दाजी त्याच्या बहिणीला व भाच्यांना मारहाण करीत असे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने प्रथम त्याच्या दाजीला दारु पाजली आणि त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केला.

हे प्रकरण अलवर जिल्ह्यातील सदरजवळील विज्ञान नगरशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव मुकेश सैनी असे आहे. खुनाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, मुकेश सैनीची हत्या त्याचा मेहुणा ओम प्रकाश सैनी यांनी केली होती. दारू पिऊन त्याने दोरीने गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपी ओम प्रकाशला अटक केली आहे.

आरोपी ओम प्रकाशने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या दाजीला यामुळे ठार केले कारण त्याचा दाजी त्याच्या पत्नीवर चुकीची नजर ठेवत असे. तो मद्यपान करुन त्याला फोनवर घाणेरड्या भाषेत बोलत असे. याशिवाय तो आपल्या बहिणीला व भाच्यांना मारहाणही करीत असे.

आरोपीचे म्हणणे आहे की, बरीच समजूत घालूनही मृत मुकेश त्याच्या पत्नी व बहिणीचा छळ करीत होता. यामुळे रागाच्या भरात मेहुन्याने त्याच्या दाजीला ठार केले. पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, हॉल्ट गिरणीतील रामू लाल सैनी यांचा मुलगा मुकेश सैनी 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता राकेश, रोहित आणि सुबोधकडे आपल्या कामाचे पैसे आणण्यास गेल होता. संध्याकाळपर्यंत तो घरी आला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता विज्ञान नगरात मुलाचा मृतदेह सापडला.

याप्रकरणी कारवाई करत असताना पोलिसांनी आरोपी ओम प्रकाश सैनी याला अटक केली आहे. त्याने सांगितले की, मृतक मुकेशला दारूचे व्यसन असून तो मजूर म्हणून काम करीत होता. मृतक मुकेशचा मेहुणा ओमप्रकाश यांची पत्नी व त्याच्या पत्नीला बेकायदेशीरपणे त्रास देत असे. या प्रकरणावरून या दोघांमध्ये बऱ्याचदा वाद झाला होता. जेव्हा त्याने ऐकले नाही, तेव्हा मेहुण्याने त्याच्या दाजीला दुचाकीवर नेले आणि विज्ञान नगरच्या निर्जन भागात गेल्यानंतर दोघे दारु प्यायले. त्यानंतर त्याने गळा दाबून खून केला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी तिजारा येथे भाजीपाला विकण्याचे काम करतो. दाजीच्या या कृत्यांमुळे तो खूप नाराज झाला कारण त्याचा दाजी मुकेश काही कमवत नव्हता म्हणून त्याने मुकेशला बर्‍याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण मुकेश सुधारण्याचे नाव घेत नव्हता. यामुळे त्रस्त होऊन त्याने हे पाऊल उचलले.