राजस्थानमधील घडामोडींवर कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले – ‘घोडे तबेल्यातून बाहेर गेल्यावर आपण जागे होऊ का !’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील कॉंग्रेसच्या संकटावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. सिब्बल म्हणाले की, आपण कधी जागे होणार? आपल्याला तेव्हा जाग येईल का, जेव्हा आपले घोडे तबेल्यातून निघून गेले असतील ? दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपने राज्यात कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अशोक गहलोत म्हणाले की, 10 ते 15 कोटी देऊन राजस्थान कॉंग्रेस व अपक्ष आमदार खरेदी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

पार्टीसाठी चिंतेत
राजस्थानमधील या घडामोडींवर कपिल सिब्बल यांनी ट्वीट केले की, “मला माझ्या पक्षाची चिंता आहे, घोड्यांनी तबेला सोडल्यावरच आपण जागे होऊ का?” या ट्विटमध्ये कपिल सिब्बल यांनी कोणत्याही राज्यातील घटनांचा उल्लेख केलेला नाही, पण ट्विटमध्ये सिब्बल राजस्थानकडे लक्ष वेधत असल्याचे समजते आणि या प्रकरणात ते कॉंग्रेस हाय कमांडला हस्तक्षेप करण्यास सांगत आहेत.

सचिन पायलट दिल्लीत
दरम्यान, राजस्थानमध्ये सीएम अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी जयपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सचिन पायलट सहभागी झाले नाहीत. यावेळी सचिन पायलट दिल्लीत असल्याच्या बातम्या आहेत, यावेळी 10 आमदारही दिल्लीत असल्याची बातमी आहे. या आमदारांना कॉंग्रेस हाय कमांडला भेटून त्यांच्या समस्या मांडायच्या आहेत.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे निवेदन नोंदवा
राजस्थान सरकारच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. तर एसओजीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यासाठी नोटीस पाठविले आहे.

भाजपने दिले आव्हान
कॉंग्रेसच्या आरोपावर भाजपने आव्हान केले आहे की, मुख्यमंत्र्यांनी अशोक गहलोत यांनी आमदारांच्या घोडेबाजाराचे आरोप सिद्ध करावे. अन्यथा राजकारण सोडावे. भाजपने म्हटले आहे की, अशोक गहलोत हे कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादास नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहेत, त्यामुळे त्यांना भाजपवर हल्ला चढवून आपले अपयश लपवायचे आहे.

राजस्थानात किती जागा
200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेमध्ये कॉंग्रेसकडे 107 आमदार आहेत. यामध्ये बसपापासून दूर गेलेल्या आणि गेल्या वर्षी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या 6 आमदारांचा समावेश आहे. कॉंग्रेसला 12 अपक्षांचाही पाठिंबा आहे. त्याचबरोबर, भाजपकडे 72 आमदार आहेत. हनुमान बेनीवाल यांच्या पक्षाचे तीन आमदार आरएलपीच्या पाठिंब्याने ते 75 वर पोहोचले.