जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील काही भागात अजूनही घुंघट म्हणजेच डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. हळूहळू या प्रथेबाबत राजस्थानात आवाज उठवण्यात येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात घुंघट आणि बुरखा प्रथेचे निर्मुलन करण्यात यावे, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभुमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
या महिन्यात राजस्थानात पंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी मतदान करायला येणाऱ्या महिलांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा दूर करावी यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ‘घुंघट हटाव’ मोहिमेअंतर्गत महिलांमध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी राजस्थानातील गावागावात विशेष मोहीम हाती घेतली जात आहेत.
याबाबत बोलताना बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचे तळागाळातील कार्यकर्ते, साथीन, महिला बचतगटांतील सदस्य आणि स्थानिक महिला दर शुक्रवारी विविध विषयांवर बैठक घेत असतात. अशा बैठकांमध्ये दर महिन्याच्या एका शुक्रवारी ‘घुंघट’च्या मुद्द्यावर चर्चा केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘चौपाल रात्री’मध्येही ‘घुंघट हटाव’चा संदेश दिला जातो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या विशेष मोहिमेमध्ये तळागाळातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –