‘ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसतं’; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाजार समित्यांमध्ये सर्व काही सुस्थित आहे असं आमचं म्हणण नाही. बाजार समितीच्या प्रचलित पध्दतीत पैसे कमी मिळत आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची हमी आहे. यामुळे बाजार समितीतील कायदे कडक करावे. ते अधिक सक्षम केले पाहिजेत. तसंच कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन हे शेतकऱ्यांचे नाही ते बाजार समित्यातील अडत्यांचं आहे. असा आरोप काही जण करत आहेत. पण हे आरोप करत आहेत त्या संघटना ह्या सरकारच्या बाजूने आहेत. याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘घरात ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसत’असे उदाहरण देत त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.

पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी माजी खासदार राजू शेट्टी त्यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, बाजार समितीसह खुल्या बाजाराला परवानगी देणे म्हणजे, बाजार समित्या दुबळ्या करणे व कालांतराने त्या बंद करणे हा या कायद्यांमागील उद्देश आहे.

चंद्रकांत पाटील हे लोकशाहीची उदाहरणे देत असतील तर त्यांनी, प्रथम कृषी कायदे मंजूर करताना हरकती व सूचना का मागविल्या नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावं. कांदा निर्यातीवरून बोलताना त्यांनी, पिका-पिकात दुजाभाव करण्याचा सरकारला काही कारण नसून, जसे ऊस पिकाला हमी भाव मिळतो तसा इतर पिकांनाही हमीभाव निश्चित केला पाहिजे.