प्रियांका गांधींनी PM मोदींवर टीका करताच भाजपच्या राठोड यांनी केली ‘ही’ विनंती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच मुद्यावरून केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजप नेते राज्यवर्धनसिंग राठोड यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

राज्यवर्धन राठोड यांनी प्रियांका गांधी आणि काँग्रेसवर पलटवार केला. त्यामध्ये राठोड यांनी म्हटले, की ‘तुम्ही खासगी कंपन्यांना दोष देत आहात. ज्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक या लढाईत सहभागी आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची टिप्पणी करू नये. केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाही’.

दरम्यान, आता राजस्थानमध्ये दारूची विक्री खुलेआम होत आहे, पण बाजारपेठा बंद आहेत. या राज्यात बेड्स, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही कोरोना विरुद्ध लढाईसाठी राज्य सरकारची तयारी आहे का? असा सवालही उपस्थित केला होता. तसेच केंद्र सरकारकडून सुरू असलेली लसीकरण मोहीम ही नोटाबंदीपेक्षा कमी नाही. कारण या लसीकरणासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे, त्यांचे पैशांचे नुकसान होत आहे आरोग्य धोक्यात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राज्यवर्धनसिंग राठोड ही विनंती केली आहे.