राखी म्हणते, … तर मी बॉम्ब लावून पाकिस्तानात जाऊन सर्वकाही संपवेल

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि पाकिस्‍तानमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बॉलिवूड स्‍टार्सही त्याबबात आपल्‍या भावना व्‍यक्‍त करत आहेत. आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमुळे राखी सांवत नेहमीच चर्चेत राहते. आता याविषयावरही राखीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. राखी देशासाठी जीव द्‍यायला तयार आहे. गरज पडल्‍यास स्‍वत:च्‍या शरीरावर बॉम्‍ब बांधून पाकिस्‍तानच्‍या शत्रूभागात जाईन आणि सर्वकाही संपवेन, अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. लुधियानामधील ए‍का कार्यक्रमात ती बोलत होती.

पुलवामा हल्‍ल्‍यानंतर पाकिस्तानमध्‍ये असलेल्या दहशतवादी तळांवर पी.एम. मोदी यांच्‍याकडून एअर स्ट्राईक करण्‍यात आला. हा निर्णय कौतुकास्‍पद आहे.”मी फार काही बोलू शकत नाही. परंतु, मी माझ्‍या देशासाठी जीव देऊ शकते. माझी इच्छा आहे की, ५० ते १०० बॉम्‍बघेऊन त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांना उद्‍ध्‍वस्‍त करावं. मी पायलट अभिनंदन यांच्‍या सुरक्ष‍ित देश वापसीची प्रार्थना करते, असं तिनं म्हटलं आहे.

दरम्यान, पायलट अभिनंदन दि. १ मार्च, २०१९ रोजी भारतात परतणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली होती. अभिनंदन यांच्‍या सुरक्ष‍ित वापसीचे तमाम बुलिवुडकरांनी आणि खेळाडूंनी अभिनंदन यांचे स्वागत केले आहे.