‘सर्व शिक्षा अभियान’च्या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात केला आहे. संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक व वादग्रस्त उल्लेख केल्याने संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’242973ca-cd3f-11e8-a59f-05931e5083f3′]

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. सर्व शिक्षा अभियानात समाविष्ट असणाऱ्या या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3270153f-cd3f-11e8-9d9d-3b805f4aa86e’]

संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आहे. इतिहासात असा कोणतंही पुरावा नसताना कोणत्या आधारावर हा उल्लेख केला आहे तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. असा संभाजी महाराजांविषयी दिशाभूल करणारा व बदनामी करणारा मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.