… तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावं लागेल, शिवसेनेनं काढला चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोटेल करून कोरोना टेस्ट करून घेण्यास सांगितले आहे. गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच आयसोटेट कावे लागेल, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामानाच्या अग्रलेखातून हा चिमटा काढण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनाऱ्यावर ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील, अडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभुमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. कोरोना वैगेरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

शहा एकांतवासात तरीही गेहलोत सरकराला धोका
अमित शहा यांच्या प्रतृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करतो.गृहमंत्री शहा यांच्यावर कोरोनाने झडप घातली व शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्रक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागेल. म्हणजेच धोका कायम आहे, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून लगावला आहे.

शिवसेनेनं काय म्हटल ?
– गणेश पूजानाने सुरुवात झाली असतानाच देशातील अनेक प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्हने आजारी पडून इस्पितळात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या गुडगावमधील इस्पितळात पडून आहेत.

– अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडाव, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचं दुर्दैवच म्हणावे लागले. पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे संन्यासी मुख्यमंत्री योगी महाराज व इतर निमंत्रित तर असतीलच, पण गृहमंत्री शहांशिवाय हा सोहळा फिकाच पडेल.

– पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय म्हणून तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख सहकारी म्हणून शहा हे पंतप्रधानांच्या निकट असतात, पण श्रीरामाच्या आशिर्वादाने पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही. या कामी राहुल गांधी यांनी अमित शहांना दिलेल्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत.