शिवसेना म्हणते यंदा कुठलीच लाट नाही

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही, कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविली जात नाही. त्याच प्रमाणे २०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्त व खासदार संजय राऊत यांनी दिला.

नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ असलेल्या राऊत यांनी आज प्रत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत. या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधान पदासाठी इच्छूक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छूक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते.

निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येवून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्यावर बोलताना राऊत यांनी मोदी यांच्या सर्व सभा राजकीय असल्यामुळे ते ज्या राज्यात जातात तेथील राजकारणावर ते बोलतात.

वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोपाचे त्यांनी खंडन केले. रिपाईंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येवून रालोआत सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.