नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबाद सामुहिक बलात्कारानंतर देशात संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. याची दखल घेत काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश सरकारने झटपट न्याय देणारा विशेष कायदा केला होता. आता महाराष्ट्रातही असा कायदा होऊ शकतो. कारण, महाराष्ट्रातही बलात्काराच्या आरोपींना शंभर दिवसांत फाशी दिली जावी, असा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सभागृहात मांडला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे.
यासंबंधी माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले, आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकतो, यासंबंधी अहवाल आणि मसुदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला आहे. देशात बलात्काराचे प्रमाण खुपच वाढले आहे. यास आळा घालण्यासाठी प्रत्येक राज्यात हा कठोर कायदा लागू झाला पाहिजे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा कडक कायदा करण्याची मागणी केली. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असून जलद कार्यवाही झाल्यास याच अधिवेशनात हे विधेयक संमत होऊ शकते, असे सरनाईक यांनी सांगितले.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती