Shivsena Vs BJP | ‘लोकशाहीत मालक बदलत असतात, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे’ – शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Shivsena Vs BJP | भाजपकडून तपास यंत्रणांचा होणाऱ्या वापराबाबत शिवसेनेने पुन्हा एकदा सामनातून आवाज उठवला आहे. भाजपवर जोरदार निशाणा साधला (Shivsena Vs BJP) आहेत. तपास यंत्रणांचे आपणच मला आहोत असे समजून भाजप चालत असले तर लोकशाहीत मालक बदलत असतात. हे भाजपनेच तसेच त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे, अशा शब्दात शिवसेनेने टीका केली (Shivsena Vs BJP) आहे. पक्षाच्या नाड्या खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती आहेत. या नाड्यांची गाठ कधी सैल होऊन ते कधीही उघडे नागडे होतील. २५ कोटी वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मला आणि त्यांच्या नोरानी सावध रहावे असा थेट इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

 

काय म्हटलंय अग्रलेखात?

 

पवित्र झग्यातून भाजपचा काही जन्म झाला नाही. इतर राजकीय पक्षाप्रमाणे हाडा-मांसाचाच हा पक्ष बनला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत.
हे त्यांच्या प्रमुख लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सत्तेची तागडी वर-खाली होतच असते, हे त्यांनी विसरू नये.
तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जो धुमाकूळ सुरु आहे त्यातील एक एक प्रकरण त्यांच्यावरच उलटत आहे.
त्यातले नवे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रुझवरील (Cordelia Cruz) ड्रग्ज पार्टीतले उपद्व्याप. या क्रुझवर काही तरुण पोरांनी अमली पदार्थांचे सेवन केले किंवा बाळगले.
सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला.
या प्रकरणाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली याचे कारण म्हणजे खान याचा मुलगा आर्यन याच्यामुळे.

 

त्या प्रसिद्धीमुळे एनसीबीचे (NCB) उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान झाले. सुशांतसिंग राजपूत (SSR) याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्या संपूर्ण प्रकरणास अमली पदार्थ व्यवहाराचा रंग चढवणारे व त्यात रिया चक्रवर्तीस (Riya Chakraborty) तुरुंगात पाठविणारे हेच अधिकारी होते. सुशांत अमली पदार्थाचे सेवन करत होता हे खार आहे.
रियाकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नव्हते. हे पदार्थ देणाऱ्या-घेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते.
या चार हजारांची किंमत म्हणून रियाला महिनाभर तुरुंगात राहावे लागले.
चार हजार रुपयांच्या अमली पदार्थाची चौकशी करणे हे ‘एनसीबी’चे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे एक स्वतंत्र पथक आहे.
हे अमली पदार्थ विरोधी पथक अधून मधून कोटय़वधी रुपयांचा ‘माल’ पकडत असतात व नष्टही करतात, पण ते फालतू प्रसिद्धीसाठी उद्योग करीत नाहीत.

 

मोठा उत्सव केला

 

कॉर्डेलिया क्रुझवर एक-दोन ग्रॅम अमली पदार्थ सापडले अन त्याचा एनसीबीच्या समीर वानखेडे नामक अधिकाऱ्याने मोठा उत्सव केला.
त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३५०० किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत २५ हजार कोटी इतकी आहे. बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत.
पण हे प्रकरण कधी झाले आणि संपले हे कळलेच नाही. कारवाई व प्रसिद्धीच्या बाबतीत बोलायचे झाले तर ३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले.
हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे! १ ग्रॅम चरस प्रकरण सुरूच आहे व आर्यन खानसह काही मुले तुरुंगात आहेत. (Shivsena Vs BJP)

 

… तर चेहराच ओरबाडून निघाला

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केले या आधीच्या कारवाया धाडसी होत्या. पण शेवटी कायद्याची चौकट पाळावीच लागेल.
त्यात गफलत झाली की कारवाई वादग्रस्त ठरते. संशयाच्या भोवऱ्यात सापडते. त्यामुळे आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरतात हे ज्याचे त्याने शोधायला हवे.
लोकशाहीत अशा कारवायांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. आर्यनवरील कारवाई टाळण्यासाठी मध्यस्थांमार्फत २५ कोटींची मागणी झाली.
समीर वानखडे यांना त्यातील ८ कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार होती.
त्यातली काही रक्कम इकडे तिकडे कशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले.
या प्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे.

 

तो बेपत्ता झाला की त्यास बेपत्ता केले, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच या प्रकरणी ओरबाडून निघाला आहे.
यामध्ये प्रश्न शाहरुख आणि त्याच्या मुलाचा नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे.
पैशासाठी व राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वापर धिक्कारार्ह आहे.

 

… तर मुंद्रा पोर्ट प्रकरणात कितीची तोडबाजी?

 

राज्यात येऊन एनसीबीचे अधिकारी खोटी प्रकरणे करतात. लाचखोरी करतात. त्यांना जाब विचारणाऱ्याना भाजपचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात.
हा नादानपणा आहे. खोटी प्रकरणे करून काळा पैसा व प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झाला आहे.
आर्यन प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार? या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच राज्याचे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी लावून धरले आहे.
लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा वादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हेदेखील खरेच.
कठोर टीका करायला हरकत नाही पण ती कारवाईपुरतीच मर्यादित राहील हे पाहायला हवे.असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

 

Web Title : Shivsena Vs BJP | shivsena saamna editorial slams bjp over sameer wankhede aryan khan drug case and demands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू

Pune Crime | DSK यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्याचा जामीन फेटाळला