तुरुंगातून सुटताच तरुणाने केली आत्महत्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मारहाणीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या तरुणाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागर पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

सागर पाटील हा घणसोली सिम्प्लेक्स येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतो. काही महिन्यापूर्वी या परिसरामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. पोलिसांनी या गुन्ह्यात दोन्ही गटातील काहींना ताब्यात घेतले होते. सागर पाटील याला देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांनी हाणामारीचा गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सागर पाटील याला या गुन्ह्यामध्ये कारावासाची शिक्षा झाली होती.

शिक्षा झाल्यानंतर सागर मंगळवारी तुरुंगातून सुटला होता. दुपारी घरी आल्यानंतर घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री घरचे लोक आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकणाची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’