सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : PM मोदींनी घेतली सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची दखल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून तपास सुरु असून बॉलिवूडमधील अनेकांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्याम स्वामी यांनी देखील सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे आता सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरत पंतप्रधानांना पत्र पाठवून सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी त्यांच्या पत्राची दखल घेतली असल्याची माहिती स्वामींचे सहकारी व वकील इशकरण सिंह भंडारी यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी ट्विट करुन दिली आहे.
काय लिहले पत्रात ?
स्वामींनी 15 जुलैला मोदींना पत्र लिहले होते. असोसिएट इन लॉ इनकरण सिंह भंडारी यांनी केलेल्या रिसर्चचा हवाला देत त्यात त्यांनी लिहले आहे की, माझ्या असोसिएट इ लॉ इनकरण सिंह भंडारी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येसंदर्भात काही रिसर्च केला आहे. तुम्हाला सुशांतच्या अकाली निधनाबद्दल माहिती असेलच. पोलीस अद्यापही या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी मुंबईतील आपल्या काही सूत्रांकडून ऐकलेय की, या प्रकरणात दुबईतील डॉनशी संबंधित बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मोठे लोक सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या सिद्ध करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत.
https://twitter.com/ishkarnBHANDARI/status/1286890201667604480
Dr Subramanian @Swamy39 had written letter dr 15th July 2020 to @narendramodi @PMOIndia on the mysterious death of Actor Sushant Singh Rajput & asked for CBI investigation, Now Namo by letter dt 20th July has acknowledged the letter pic.twitter.com/1updoiWQFq
— Jagdish Shetty (@jagdishshetty) July 25, 2020