‘ठाकरे सरकार गोंधळलेले, आम्ही पाडण्याच्या भानगडीत पडणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ठाकरे सरकार सातत्याने गोंधळलेल्या स्थितीत असून, ते पाडण्याच्या भानगडीत आम्ही पडणार (thackeray-government-is-confused-we-will-not-try-to-fall) नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp-leader-chandrakant-patil) यांनी म्हटलेे आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेने आपल्या निवडणूक वचननाम्यात काय म्हटल होते, याचादेखील त्यांना विसर पडला आहे. अगदी कोरोना काळात दिलेले आश्वासनही ते विसरले आहेत, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, एकीकडे वीज देयकात सवलत देता येणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट करून राज्यभरातील वीज ग्राहकांना शॉक दिला आहे. त्याचवेळी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने घरगुती वीजबिलात 30 टक्के कमी करू असे वचन दिले होते. त्याचाही या सरकारला विसर पडला आहे. हे सरकार सातत्याने गोंधळलेल्या स्थितीत आहे. कायम विरोधाभास दिसतो आहे. लोकांच्या मनात गोंधळ आणि अस्वस्थता आहे. लोकांच्या सहनशक्तीचा अंत होत चाललेला आहे. शाळांबाबतीतही गोंधळ झाला आहे. आता सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरेल. मराठा आरक्षण असो की, कोणताही विषय काहीच ताळमेळ राहिला नाही. यांची पॅकेजेस हवेत आहेत. पालघर प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी ही सर्वसामान्यांची आहे. आमच्या खुशाल चौकशा करा, आम्ही दिवसभर काम करून रात्री शांतपणे झोपतो. कांजूरच्या जागेत गुंतागुंत असल्यानेच तिथे कारशेड करायचे नाही, असा आम्ही निर्णय केला होता. आत हे सरकार कायदेशीर गोष्टीत अडकणार असून, यांना कोर्ट परवानगी देणार नाही, असे ते म्हणाले.