मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूत याच्या संशयित मृत्यूचा तपास सुरु असताना सीबीआय समोर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आले. यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली. यानंतर लोकांमध्ये बॉलिवूडची प्रतिमा मलीन होऊ लागली आणि संपूर्ण बॉलिवूडलाच लोक दोष देऊ लागले.
सिर्फ कुछ लोगों के ड्रग्स लेने की वजह से समस्त बॉलीवुड का नाम खराब करना गलत है। जो भी ड्रग्स मामले में सम्मलित हैं उन पर कार्रवाई भी हो रही है। लेकिन बॉलीवुड ने दुनियां भर में देश का नाम रोशन किया है और महाराष्ट्र के साथ पूरा देश उनके साथ है।
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 17, 2020
प्रसारमाध्यमांद्वारे बॉलिवूडबाबत मिळणारी माहिती यामुळे लोकही काही ठराविक माणसांमुळे संपूर्ण बॉलिवूडला दूषणं लावू लागले. मात्र या सर्वावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून खास वक्तव्य केले आहे. बॉलिवूडने जगभरात देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या सोबत आहे, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे. जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे. मात्र बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असे देशमुख यांन म्हटले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हीने वारंवार बॉलिवूडधील ड्रग्ज माफियांचा मुद्दा उचलून धरला असून यावरुन ती सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. सुशांतसिंह प्रकरणावरुन तीने मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारलाही टार्गेट केले आहे.