मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बसवण्याचा शिवसैनिकांच्या मनात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
शरद पवार म्हणला, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवेन असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक हवं ते करायला तयार होते. त्याचप्रमाणे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे असं अनेक कट्टर शिवसैनिकांच्या डोक्यात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद स्वीकरण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र धरुन चालायचे असले तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा असा आदेश मी दिला. त्यानंतर त्यांनी विचार करून मुख्यमंत्रीपद स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शिवसेनेची खात्री पटल्यानंतरच मी काँग्रेसच्या इतर नेत्यांशी न बोलता थेट सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आघाडी करण्याची गरज असल्याचे त्यांना सांगितले. माझ्या सभांचा लाभ काँग्रेसच्या उमेदवारांनाही झाली. जर वेगळी भूमिका घेतली तर त्यांचा तोटा त्यांना होता. त्यामुळे भाजप वगळून सरकार स्थापन होत असेल तर विरोध करु नये, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे अशी चर्चा सोनिया गांधी यांच्याशी केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
Visit : policenama.com
- ‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या
- नेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ! ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक
- कर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे
- मुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष
- लिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी !
- मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये
- प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे