Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकसानग्रस्त भागात पोहचले आहेत. यावेळी त्यांनी गंगापूर परिसरातील शेतकऱ्यांची (Farmer) भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर मांडल्या. तर धीर सोडू नका असे ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. आपण सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांनी आसूड ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणा, अशी मागणीच केली.

 

हा आसूड तुमच्याच हातात शोभतो. तुम्ही तो वापरत नाही. तो वापरा. मी तुमच्या पाठीशी आहे. या अडचणीच्या काळात एकत्र होता. संकट दूर झाल्यावर शेतकरी दूर होतात. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी एकत्र रहा. हा आसूड घेऊन फिरु नका, तो आता वापरायचा असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा
राज्यात शिंदे गटाने (Shinde Group) केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
विशेष म्हणजे हा दौरा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केला असल्याने, सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे.
ठाकरे आजारी असताना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज नुकसानग्रस्त भागात पोहचले आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे गटात यानिमित्ताने चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे.

 

दरम्यान औरंगाबाद विमानतळावर (Aurangabad Airport) उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
महिला शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे औक्षण केले.
यावेळी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray met farmers in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’

Uddhav Thackeray | …याची जबाबदारी घेऊन आज शेतकर्‍यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

Maharashtra Politics | दिपाली सय्यद यांना किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या – ‘ठाकरेंवर टीका केली की शिंदे गटात मोठे पद मिळते’