‘हिटमॅन’ रोहित आणि कॅप्टन विराटच्या वादावर कपिल देवचं ‘मोठं’ वक्‍तव्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२० सामन्यांच्या मालिकेपासून भारताची या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला असून  या दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा माध्यमांत झळकत होत्या. त्यावर कर्णधार विराट कोहली याने आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर आता या दोघांच्या वादावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केले आहे. या वादाविषयी बोलताना कपिल देव म्हणाले कि, कोहली आणि रोहित यांच्यात मैदानाबाहेर मतभेद असले तरी त्याचा काही फरक पडत नाही. मैदानात दोघे कशी कामगिरी करतात हे महत्वाचे असल्याचे मत कपिल देव यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना कपिल देव म्हणाले कि, मैदानावर प्रत्येकाचं लक्ष हे चांगली कामगिरी करण्याकडे आणि सामना जिंकण्याकडे असावे. त्यामुळे मतभेद असले तरी काही फरक पडत नाही, असे देखील कपिल देव यांनी म्हटले. त्याचबरोबर या वादाला प्रसारमाध्यमांनी देखील खतपाणी घातल्याचे कपिल देव यांनी म्हटले.

तर धावा झाल्या नसत्या

दोघांमधील वादाविषयी कर्णधार कोहली याने पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हटले होते कि, आमच्या दोघांमध्ये कोणतेही वाद नसून जर दोघांमध्ये वाद असते तर वर्ल्डकपमध्ये दोघांचेही प्रदर्शन खराब झाले असते त्याचबरोबर दोघांच्याही धावा झाल्या नसत्या. त्याचबरोबर आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून या वादाचा आरोप कोहलीने अनेकवेळा फेटाळला आहे.

दरम्यान, भारतीय संघाची निवड हि कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार असून या समितीत माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाची माजी खेळाडू शांता रंगास्वामी यांचा देखील समावेश आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –