विंग कमांडर अभिनंदन यांना ‘या’ खडतर परिक्षांचा करावा लागणार सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तब्बल तीन दिवसांनंतर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना खास हेलिकॉप्टरने दिल्लीत आणण्यात आले आहे. शत्रू राष्ट्रातून परत आल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे एका मोठ्या परिक्षेचा सामना करावा लागणार आहे.

वायुसेनेच्या नियमांनुसार अभिनंदन यांना आज ‘डीब्रिफिंग’ आणि ‘बग स्कॅनिंग’ चा सामना करावा लागणार आहे. यामध्ये सेना आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहे. यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप होईल.

वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनंदन यांना भारतात वापसीनंतर काही परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. हे खरतर चांगलं वाटत नाही मात्र, भारतीय वायुसेनेचे नियम आणि कायदे कडक आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या देशात पकडल्यानंतर आपल्या देशात आल्यावर या टेस्टचा सामना करावाच लागतो. याला अन्य कुठलाही पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतासमोरचा यक्षप्रश्न…! 

वायुसेनेचे अधिकारी आज त्यांच्याशी पाकिस्तानात घालवलेल्या वेळेबद्दल विचारपूस करतील. वायुसेनेच्या इंटेलिजन्सची ही डीब्रीफिंग खूप त्रासदायक असते. वायुसेनेच्या नियमांनुसार हे अनिवार्य असते. यामध्ये दुष्मनांनी पकडलेल्या जवानांकडून कैदेत असताना काही माहिती दिली आहे का ? दुष्मनांच्या सेनेने त्यांना त्यांच्या सैन्यात सामावून तर घेतले नाही ना ? या गोष्टींवर बारकाईने विचारपूस केली जाते.

यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना काही मेडिकल टेस्टचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील होईल.

यानंतर अभिनंदन यांची स्कॅनिंग होईल. ज्यामध्ये पाकिस्तानी आर्मीने काही ‘बग’ फिट केला आहे का ? याबद्दल जाणून घेतले जाईल.
यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सायकॉलॉजिकल टेस्ट देखील होईल. यामध्ये त्यांची मानसिक स्थिती कशी आहे ? याची माहिती काढली जाईल.

यानंतर विंग कमांडर यांच्याशी इंटेलिजेंस ब्यूरो आणि रिसर्च अँड अनॅलिसिस विंग सुद्धा चौकशी करेल. या सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर ते पुन्हा सेवेत दाखल होतील. सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांना काही दिवस विश्रांतीसाठी सुट्टी घेता येणार आहे.